Share

Share

Saturday, June 9, 2012

सुरु होण्याआधी संपली हि कहाणी..

सुरु होण्याआधी संपली हि कहाणी..
साक्षीला उरले फक्त डोळ्यात
पाणी...

नकळत तुझे आयुष्यातून निघून
जाणे..
जशी फुललेली बाग क्षणात ओसाड
होणे..

अश्रुनी दाटलेल्या डोळ्यांनी तुला शेवटचे
पाहणे..
भर उन्हाळ्यात मग पावसाचे आगमन
होणे..

तुझ्या आठवणीने पापणीचे..
ओलचिंब होवून जाणे ..
शांत अशा सागरात लाटेचे ते
उसळून येणे.

तुझ्या आठवणीरुपी सागराला शांत
कसे करता येईल...
हृदयात कोरलेल्या आठवणी कशा पुसता येतील...

0 comments:

Post a Comment